शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:46 IST

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला

ठळक मुद्देजयसिंगपूर येथील विराट ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग; धुराडी पेटू न देण्याचा इशारासंसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार

विश्वास पाटील-राजाराम लोंढे-संदीप बावचे जयसिंगपूर : उसाला पहिली उचल टनास एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यास शेतकºयांनी हात वर करून व मुठी आवळून प्रतिसाद दिला. पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक आहे; परंतु सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत ऊसतोड नाकारा, असे शेट्टी यांनी शेतकºयांना बजावले.

या परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून शेतकरी प्रचंड संख्येने आले होते. खोत यांनी ऊसदर म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, अशी टीका केली होती, त्यास उत्तर द्यायला लोक त्वेषाने आले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. विक्रमसिंह मैदानावर झालेल्या या सोळाव्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे-नेसरीकर होते.

ऊसदराचा महाराष्ट्राला लागू होणारा निर्णय याच परिषदेत होणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ऊसदराचे काय ठरवायचे, अशी विचारणा करीत आहेत. हा प्रश्न तुम्हाला संपला असल्याचे वाटत असेल, तर मग गेल्यावर्षी ऊसदराचा प्रश्न मी सोडविला असे श्रेय घ्यायला कशाला आला होता..? यंदा देशात जो साखरसाठा शिल्लक आहे, तो या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयात न केल्यास तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळेल. थोडा धीर धरा. देशाची गरज २४० लाख टनांची आहे व तेवढेच उत्पादन होणार असल्याने चांगला दर मिळेल, परंतु त्यासाठी १५ दिवस कारखाने बंद पाडायची तयारी ठेवा.

यावेळची लढाई दुहेरी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘ऊसदरासाठीचा संघर्ष आहेच, परंतु त्याशिवाय देशातील शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्यासाठीही संघर्ष करायचा आहे. जोपर्यंत खासगी सावकारांसह शेतकºयांच्या डोक्यावरील संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत ही लढाई आता थांबणार नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही देशभरातील शेतकºयांना घेऊन दिल्लीवर धडक देणार आहे. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार असून, त्यातील एक सत्र आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवा घेणार आहेत. त्यातील ठराव आम्ही राष्ट्रपतींना भेटून देणार आहे. ही खरी कष्टकºयांची संसद असल्याचे आम्ही देशाला दाखवून देऊ.’‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’च्या खर्चासाठी शेतकºयांचा प्रतिसादसात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देण्यासाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ म्हणून एक स्पेशल रेल्वेच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.राज्यातील आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकºयांच्या विधवांना सन्मानाने किसान संसदेला नेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खर्चासाठी संघटनेच्यावतीने मदतीच्या आवाहनास शेतकºयांनी भरभरून प्रतिसाद दिला.आमच्यामुळेच ४२ खासदारखासदार शेट्टी म्हणाले, ‘भाजपवाल्यांना मते द्या, असे सांगत मी महाराष्ट्राच्या गावागावांत गेलो म्हणून कधी नव्हे ते ४८ पैकी ४२ खासदार भाजपचे निवडून आले; परंतु निवडून आलेले भामटे निघाले. भाजपवाले मला म्हणतात की मोदींवर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. परंतु तुम्ही शेतकºयांच्या जीवनात अच्छे दिन आणतो असे सांगून आमचा विश्वासघात केला, त्याच्या यातना आम्हाला होत नाहीत का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.‘लोकमत’ चे अभिनंदनऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात ऊस दराचे अर्थकारण मांडणारे लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल परिषदेत ‘लोकमत’चे अभिनंदन केले. उपस्थित शेतकºयांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप